Friday, January 21, 2022

मंगल अक्षता - (चिरंजीव विजय आणि चि. सौ.कां. रुचिरा)





चिरंजीव विजय आणि चि. सौ.कां. रुचिरा यांच्या २६/१२/२०२१ रोजी पुण्यनगरी इथे झालेल्या
मंगल विवाहा प्रीत्यर्थ उधळलेली काव्य सुमनं..

श्री तुझ्या वंदनाने ,शुभकार्ये प्रारंभतो.
अंबे तुझा वरदहस्त ,कायमच स्मरतो.
या मंगल कार्यास, तुम्ही तडीस न्यावे.
तुम्हा चरणी आम्ही ,मागणे हे मागतो.ll१ll


सनई चौघड्याचे, गुंजती मंगलमय सुर.
भारावला तो जन,आला आसमंती नुर.
पुण्य नगरीत,पंचतारांकित या सुस्थळी,
शुभ लग्न समारंभी,आहे मजाच आगळी.ll२ll


श्रीधर-जयश्री ने जणू ,"विजय" हिराच घडवीला.
कर्तृत्वे गायकवाड कुली, त्याने उद्धार केला.
रुचिरा सह आता, विजयी संसार तो रंगेल.
साता समुद्रा पार ,कर्तुत्व बे-लगाम बहरेल.ll३ll


गायकवाड-चौधरी गठबंधन, होइल सुखाचे.
सुखी,आनंदी ,खास समृद्ध ,भावी आयुष्याचे.
आता असेल जीवनी ,आनंद अन् हर्ष उल्हास.
सदा उत्सव च जणू, सभोवार आसमंती खास.ll४ll


रुचिरा सह माता पित्या च्या, नयनात पाणी.
निघाली माहेरा सोडुनी, लाडकी लेक ती गुणी.
क्षणो क्षणी दाटेल नयनी, पाणी दीर्घ विरहाच.
पण समाधानी ते दोहो,पाहून सासर लाख मोलाच.ll५ll


शुभआशीर्वाद द्याया, सारा गणगोत जमला.
उत्साही आनंदे ,साऱ्या कार्यक्रमी तो रंगला.
आता मंगल कार्याचा ,परमोच्च क्षण आला.
मंगल अक्षतांचा, चहूबाजूने वर्षाव तो झाला.ll६ll


विजय-रुचिरा चा ,संपन्न झाला महनमंगल सोहळा.
सुखी आयु च्या नांदीचा, शुभसंकेत आगळा.
"नांदा सौख्यभरे " हाच ,तुम्हा एक आशिष.
दोहोंचा संसारसुखी होऊदे,भरभरून उत्कर्ष.ll७ll


कवी : बाळासाहेब तानवडे
दिनांक: २४/१२/२०२१


Thursday, May 14, 2015

काव्य अक्षता- (चि.सौ.कां. प्रियांका आणि चि. सागर)


माझी पुतणी,
चि.सौ.कां. प्रियांका आणि चि. सागर
यांच्या दिनांक ११ मे २०१५ रोजी संपन्न झालेल्या शुभ विवाहाप्रित्यर्थ उधळलेल्या
काव्य अक्षता
श्री कृपेने हा खेळ सजला.
महादेवा ते वंदन तुजला.
रवळनाथाने दिधले यांना,  समृद्धीचे दान.
सावधान शुभमंगल सावधान २  || १||

आनंदी – लक्ष्मण , आजी – आजोबा.
सुमन – मारुती , आई – बाबा.
भैय्या निलेश ची ही लाडी , बहिण ‘प्रियांका’ छान.
सावधान शुभमंगल सावधान २  || २||

काका – आत्या , मावशी – मामा.
कौतुक करण्या  झाले जमा.
लहान – थोर , पै – पाहुणे , गोतावळा हा महान.
सावधान शुभमंगल सावधान २  || ३||

ही लेक लाडकी आई-बापाची.
आज होईल पाहुणी माहेराची.
स्व-जनांचे डोळे झरती, आठवून तिच्या विरहान.
सावधान शुभमंगल सावधान २  || ४||

दिन हा मंगलमय जो आला.
आसमंत ही  सुखे गुंजला.
‘सागर’ वरे नवरी ‘प्रियांका’ , सोहळा भव्य महान.
सावधान शुभमंगल सावधान २  || ५||

रचना आणि गायन:
श्री. बाळासाहेब तानवडे
०१ मे २०१५


Wednesday, November 6, 2013

अधुरा प्रवास


दिनांक २४/०९/२०१३ रोजी आमची बहीण
 सौ. छाया सुबराव पाटील
यांना देवाज्ञा झाली.
ईश्वर तिच्या आत्म्यास चिरशांती देवो.  
 अधुरा प्रवास  
लाडकी तु बहीण माझी मायेची छाया.
सर्वगुणसंपन्न , जणु विधात्याची दया.
लहानशीच मूर्ती तुझी पण active भारी.
वावग न खपणारी,तुझा दरारा घरी–दारी.

मायबाप असूनही बालपणी झाल्या पोरक्या दिशा दाही.
मग आत्या अन आक्काच झाल्या तुझ्या सर्व कांही.
सुख - दुखी राहिला तुझ्या सोबत पांडुरंग खडा.
मग फुलून गेली जीवन बाग,पडला नक्षत्रांचा सडा.

पण यमाची नजर चुकवून वेड वहान त्याच आडव आल.
अन सकलांची याचना न सुनता तुला अवेळी घेऊन गेल.
चोविस दिसांची तुझीही आर्जवे पार मोडकळीस गेली.
अखेर स्वर्गाची हमी देवून तुला पुण्यलोकी नेली.

पाठीसी लावून तुझ्या ग माई आलो मी पाठ.
तुझ्या सवेच गाठायचा होता जीवनाचा काठ.
मात्र टाकून गेलीस आम्हास खूपच दूर - दूर.
देऊन कायमचा दुरावा अन नयनांना महापूर.

तस मिळवलं होतस जवळ-जवळ सर्वच सुख.
पण पाहायचं राहून गेल एकुलत एक सुनमुख.
शेवटी नाही केलस कोणाशीच बोलण-चालण.
अन अचानक झाल तुझ सर्वांस सोडून जाण.

तुला माई अजून खुप जगायचं होत.
कष्ट संपणारच होत,आता सुखात राहायचं होत.
का तुटला असा तुझा अवेळी मधूनच श्वास?
माई ! का राहिला तुझा हा अधुरा प्रवास? 
माई ! का राहिला तुझा हा अधुरा प्रवास? 

कवी : बाळासाहेब तानवडे

२४/०९/२०१३

Sunday, January 13, 2013

शर्मनाक

बस   नव्हे   ती   खुद्द   काळ   होता. 
वासनांचा  आगडोंब    जाळ    होता. 
जणु    असुरी   शक्तीचा   भास होता. 
सुटकेचा   केविलवाणा  ध्यास  होता. 

आक्रोश    आक्रोश   निनादत ओसंडले.
अंग-अंग, रंध्र-रंध्र  तिचे हो रड-रडले. 
दया   राहिली  दूर दूर अज्ञातवासात. 
वासनांनी    पुरे  पुरे  थैमान   मांडले. 

माणुसकीस       काळीमाच   फासला.
विखारी     डंख    मातीसच    डसला. 
इज्जतीचा     पुरता    केला फालुदा. 
जगण्यावर     सुद्धा  आणली    गदा. 

अशी शर्मनाक ना कधी घटना घडावी, 
जीने   शरमेला    ही    शरम   वाटावी. 
पापाच्या  पित्तरालाही    कधी    अशी, 
जबर  शिक्षा   म्हणुनही   ना मिळावी.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – १४/०१/२०१३
http://kavyarangmaze.blogspot.com/



Friday, October 19, 2012

मराठी माणसा...

मराठी माणूस म्हणतात धंद्यात कमी.
केला  धंदा तरी   नाही सुयशाची हमी.
आता  द्यायचाय छेद , या समजुतीला. 
एक यशस्वी उद्योजक व्हायचंय तुला. 

उच्च  शिक्षणाच्या उत्तुंग पदव्या घेतो.
आयुष्यभर नोकरीतच धन्यता मानतो.
आता विचार धाराच बदलायचीय बाळा.
एक यशस्वी उद्योजक व्हायचंय तुला.

रिस्क जोखीम म्हणून टाळतच आला. 
जीवनात कुठे नाही रिस्क ते तर बोला.
आता हा  धाडसी  निर्णय पक्का झाला.
एक यशस्वी उद्योजक व्हायचंय तुला.

एवढ्यावरच  समाधान तुजला नसावं.
आता   सुंदरशा  स्वप्नांच जग सजावं.
सज्ज हो सारी दुनिया कवेत घ्यायला.
एक यशस्वी उद्योजक व्हायचंय तुला. 

कवी : बाळासाहेब तानवडे 
© बाळासाहेब तानवडे १९/१०/२०१२ 
http://kavyarangmaze.blogspot.in/

Tuesday, October 9, 2012

मोरा रे मोरा


मोरा रे मोरा , फुलव सुंदर पिसारा.
आले काळे ढग,आला गारगार वारा.

मोरा रे मोरा, आता नाच तर खरा.
आला बघ पाऊस, सवे टपटप गारा.

मोरा रे मोरा, काय बुवा तुझा थाट.
थुईथुई नाचात करशी,सर्वांवर मात.

मोरा रे मोरा, डोईवर डुले राजस तुरा.
सौंदर्याचा मिळाला जणू ताजच तुला.

मोरा रे मोरा, तुझा रुबाब फारच छान.
म्हणूनच तर आहे तुला राजाचा मान.

मोरा रे मोरा,गातोस मियाव मियाव गाणी.
पण नाचताना कारे तुझ्या डोळ्यात पाणी?

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे ०९/१०/२०१२
http://kavyarangmaze.blogspot.in/