Showing posts with label गंभीर कविता. Show all posts
Showing posts with label गंभीर कविता. Show all posts

Sunday, December 24, 2023

स्वाभिमान


सोड रे सोड , कुण्या दये चा स्वार्थ.
जाणून घे आता स्वाभिमानाचा अर्थ.
येऊ दे जाग आता स्वाभिमानाला.
लाभू दे खरा अर्थ स्व जीवनाला.
दयेच्या जीवनास झिडकार तु दूरवर.
वाढव जीवनाचा कर्तृत्वाने उच्च स्तर.
प्रयत्ने दाखव रे आता, तुझ्यातील धमक.
जीवनास येईल बघ वेगळीच चमक.
तळपता ठेव दिवा, अंतरी स्वाभिमानाचा.
प्रकाश मान होईल मार्ग, तुझ्या जीवनाचा.
हांजी हांजी करून , नव्हे रे जीवन.
असं जिन ते , जे की जगून मरण.
स्वाभिमाना विना जीवन, नव्हे ते मरण.
हा महामंत्र नेहमी जीवनी रुजावा छान.
जीवन होईल शंभर नंबरी सोन.
केंव्हा? जर जगशील स्वाभिमानान.
अन मरशील ही स्वाभिमानान.
कवी: बाळासाहेब तानवडे
१ डिसेंबर २०२३

Sunday, January 13, 2013

शर्मनाक

बस   नव्हे   ती   खुद्द   काळ   होता. 
वासनांचा  आगडोंब    जाळ    होता. 
जणु    असुरी   शक्तीचा   भास होता. 
सुटकेचा   केविलवाणा  ध्यास  होता. 

आक्रोश    आक्रोश   निनादत ओसंडले.
अंग-अंग, रंध्र-रंध्र  तिचे हो रड-रडले. 
दया   राहिली  दूर दूर अज्ञातवासात. 
वासनांनी    पुरे  पुरे  थैमान   मांडले. 

माणुसकीस       काळीमाच   फासला.
विखारी     डंख    मातीसच    डसला. 
इज्जतीचा     पुरता    केला फालुदा. 
जगण्यावर     सुद्धा  आणली    गदा. 

अशी शर्मनाक ना कधी घटना घडावी, 
जीने   शरमेला    ही    शरम   वाटावी. 
पापाच्या  पित्तरालाही    कधी    अशी, 
जबर  शिक्षा   म्हणुनही   ना मिळावी.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – १४/०१/२०१३
http://kavyarangmaze.blogspot.com/



Monday, June 11, 2012

हरवलेली माणुसकी


कुलदीपकच हवा, शुध्द अंधविश्वास. 
मुलीचा गर्भ पोहचे,पार गटार गंगेस. 
निसर्गाचा समतोल पार बिघडून जाई. 
पुरुषाचा स्त्रीवाचून जन्मच वाया जाई. 

भ्रष्ट आचार आता नित्य नेम झाला. 
अंध वासनांच्या त्या उफाळती ज्वाला. 
कधी बळी जाते बिचारी अबला नार. 
तर कधी होरपळे ते बाल्य सुकुमार. 

संपत्तीचाच हव्यास भर-भरून राही. 
भावाची ओळख आता भावास नाही. 
अविचार , स्वार्थाने भिनली जमात. 
माता-पित्यास सोडती दूर वृद्धाश्रमात. 

नीती मूल्यांचा होई र्‍हासच जणू हा. 
सभोवर जनावरांचा भासच जणू हा. 
प्रकृतीचे हे दुष्ट स्वप्न विरून जावे. 
मनुष्यास माणुसकीचे आता भान यावे. 

कवी : बाळासाहेब तानवडे 
© बाळासाहेब तानवडे – ११/०६/२०१२ 

http://kavyarangmaze.blogspot.com/

Tuesday, July 26, 2011

लेक लाडकी - उत्तरार्ध



लेक माझी लाडकी , भाग्य घेऊन आली.
सुख-दु:खाच्या क्षणात,साथ मला देत गेली.

आई वर जीव भारी,सर्वांची तू मोठी ताई.
काही अडता-नडता , तुज कडे धाव जाई.

तुज नसे कधीही,आळस कोण्या कामाचा.
हसत मुख सदा राही , ठाव नसे घामाचा.

आकाशी या स्थित होते,चंद्र,सूर्य अन् तारे.
पण मला न कळले , कसे फिरले ते वारे.

शब्दा मागून शब्द आले, वाढले दो मुखात.
परिणीती मग झाली, अबोला अन् दु:खात.

धन-दौलत , जमीन-जुमला, ना राही माझा-तुझा.
चार दिसांच्या जीवनी या,का ही अबोलाची सजा?

अखेरचे दिन आता, बघ माझे हे आले.
यमराज काल मला,आमंत्रण देऊन गेले.

आता एकवार तरी, जावस भेट तू देऊन.
राग ,द्वेष ,अभिमान, थोड बाजूस ठेऊन.

यमराजा थोपविले, दिली हजार कारणे.
आता तरी भेट मला,सोड तुझे ते धरणे.

वाट पाहणेची आता ,लेकी पार झाली हद्द.
नेण्या स्वर्गाच्या दिशेने,चित्रगुप्त आले खुद्द.

आता पर्वा ना जनांची, तोंड देईन निंदेस.
पण रोकेन शिवण्या, तो पिंड कावळ्यास.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – २५/०७/२०११

Sunday, March 27, 2011

निष्पाप


मुलीनंतर आता मुलगाच व्हावा.
कुटुंब चौकोन परीपूर्ण व्हावा.
इच्छित माझं पूर्ण झालं.
देवानं तुझ्यारूपे मला दान दिल.

कोवळं बाळरूप पाहून तुझ,
जीवन सार्थक झालं माझं.
वंशाचा दीपक आपसुक मिळाला.
चिंता काळजी आता गेले तळाला.

बाबांचे पाय जमिनीस ठरेनात.
ताईचे डोळे भरता भरेनात.
आप्तेष्ठ सारे पाहुन गेले.
सदिच्छांचे चारी बाजून लागले ठेले.

चोवीस तास तुझा आराम होता.
भूकेचाच काय तो सलाम होता.
नामकरण विधीचा तो शुभदिन ठरला.
सहस्त्र जेवणाचा बेत रचला.

कांही दिवस कोड कौतुकात गेले.
एक दिवस साऱ्यांचे जीव आढ्याला टांगले.
तुझा प्रतिसाद कांहीच नव्हता.
तु फक्त मांसाचा जिवंत गोळा होता.

डॉक्टर वैध्यांचे सारे यत्न झाले.
आखिर यश ना कोणास आले.
माझी काय बाळा चुक झाली होती.
तुझी सारी गात्रं मूक झाली होती.

नियतीन मोठी फसवणूक केली.
स्वप्नांच्या मोत्यांची पार माती झाली.
नशिबान विचित्र खेळ मांडला.
बाळा तुझ्यासाठी माझा रोम रोम रडला.

सुन सुन सारं जग झालं.
तुझ्या काळजीन मन सुन्न झालं.
बाळा तुझ भविष्य कस असेल?
एक एक दिवस नरक भासेल.

आता तुझ पालनपोषण हेच कर्तव्य.
जरी कांहीही करावे लागेल दिव्य.
आता दुःखालाच मानू खर सुख.
पाहुन तुझ निष्पाप मुख.

असा काय देवा होशी तु निष्ठुर?
क्षणभंगुर सुख आणि दुःखाचा महापुर.
असं जीवघेणा खेळ नको रे खेळू कोणाशी.
दयाघन , कृपासिंधु हीच ओळख तुझी सदा राहो साऱ्यांशी

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – २७/०३/२०११
 प्रतिक्रीया अपेक्षित


Nishpap

Thursday, March 24, 2011

खरं स्वातंत्र्य



खुलं आकाश , मोकळी हवा.
विहरण हवं तिथं आणि हवं तेंव्हा.
कधी गाती गोड गाणी करून थवे.
गुज गोष्टी करती मुक्त वाऱ्या सवे.

खाणं पिणं जिथं मिळेल तिथं.
उद्याची काळजी चिंता कुठं?
स्वतःच्या मस्तीत मस्त जगणं.
कोणाची फिकीर ना पर्वा करणं.

मालक असती स्वतःच्या मर्जीचे.
ना आदेश देती ना मानती कोणाचे.
स्वातंत्र्य असतं हर तऱ्हेचं.
बंधन नसतं तसू भरच.

अरे माणसा बुद्धीचा तुला गर्व भारी.
शोध नवा लावशी रोज एक तरी.
पण असे स्वातंत्र्य तुला रे कुठे?
जे एका छोटयाश्या खगास भेटे.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – १४/०३/२०११
 प्रतिक्रीया अपेक्षित
Khare Swatantrya

Sunday, January 23, 2011

लेक लाडकी - पूर्वार्ध

नवसाला माझ्या तो देव ग पावला.
तयातच तुझा पोरी जनम ग झाला.

संसार वेलीला माझ्या फुलोरा आला.
घर अंगण सार भरभरून ग गेला.

रांगणार बाळरूप आता बसुही लागल.
हाती जे येई त्यास चोखूही लागल.

कौतुकान दिल तुला मुठीच खेळण.
लाडे लाडे भुईवर घेतलस तु लोळण.

शाळेशी जाण्या मग तु हट्ट जो केला.
पोरीनं शाळेत? जन अचंबित झाला.

मायेन पाटी-पेन्सिल हाती ती दिली.
बघताबघता तु पार एस एस सी झाली.

वरून साजिरा राम जणू त्याची सीता तु झाली.
पाठवणी पित्याचा दाटला कंठ , दु:खी माता तु केली. 

तु संसार केला नेटका ,झाला धन्य माझ्यातील पिता.
भावंडाना लावी जीव ,जणू त्यांची दुसरी तु माता.

सुगरण अन्नपूर्णा तु, तुझ्यात फक्त मायेचाच ठेवा.
गुणसंपन्न लेक तु माझी ,मला वाटे माझाच हेवा.

विशाल हृदय तुझे जणू सागरापरी.
सदा मदतीस हजर ,जणू तु आसमानी परी.

विश्वास नसे बसत ,अस जगी माणूस असतं.
सार्थ अभिमान वाटे , तेही माझ्या लेकीत वसतं.

पण अचानक तुझा समज असा काय झाला.
लेकी तुझा प्रिय बाबा तुला अनोळखी झाला.

दूर दूर गेलीस , आम्हा टाकुनी एकटी.
नाही वळून पाहिलीस मागे भावंडे धाकटी.

आई जणू होती तुझी पारदर्शी काचच ग.
तडकली ती ,पण शेवटी नाही सावरलस ग.
  
दमलो मी ,थकलो मी, झालो शक्तीहीन मी.
नजरेन साथ सोडली, अर्ध्या अंगानच जगतोय मी.

मरणाच्या दारात उभा , जीवनाची भैरवी गातोय मी.
तुला एकवार तरी पहावे ही एकच आशा करतोय मी.

येशील का ग माझ्या शेवटी सरणावर तरी.
फोडून हंबरडा बाबा म्हणून ढाळशील का अश्रू दोन तरी.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – २४/०१/२०११
प्रतिसादाची प्रतीक्षा
(Lek Ladaki)

Wednesday, January 5, 2011

मी कोण? आपण कोण?


न मागताच मिळे नश्वर तन.
न मागताच मिळे जोडीला चंचलस मन.
न कळे आपल्या असण्याचे काय प्रयोजन?
प्रश्न ना सुटे , मी कोण? आपण कोण?

तहान-भूक लागे, शरीर अन्न-पाणी मागे.
सारे शरीर निजे पण हृदय,श्वास जागे.
न कळे शरीर व्यवस्था चोख चालवी कोण?
प्रश्न ना सुटे , मी कोण? आपण कोण?

आस्तिक सारे देवावर विसंबती.
नास्तिक स्वत:वर भिस्त ठेवती.
वैचारिक मर्यादा न उलंघे कोण.
प्रश्न ना सुटे , मी कोण? आपण कोण?

कोण्या अज्ञात शक्तीने भव्य सृष्टी निर्मिली.
अदृश राहून सतत ती इमाने चालवली.
पण या महान कलाकृतीला दाद देणारे कोण?
प्रश्न कांहीसा सुटे , मी कोण? आपण कोण?

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे०४/०१/२०११
प्रतिसादाची प्रतीक्षा
(Mi Kon? Apan Kon?)

Friday, December 10, 2010

रक्ताच नातं

 
रक्ताच नातं बहाल होतं.
सुख दुखात जीवापाड जपलं जात.
पण अचानक असं काय घडतं.
अतूट वाटणाऱ्या नात्यात अंतर पडतं.

कालांतराने त्याच कारणही कळत.
नातं आणि धनात द्वंद्व झालेलं असतं.
नातं आणि स्वार्थाच कंद माजलेल असतं.
दोन्ही लढाईत ,घट्ट नातच हरलेल असतं.

पण वियोगात नात्याची याद छळेल.
भुतकाळ सध्य स्वप्नात भरून उरेल.
अडचणींच्या काळात प्रचीती मिळेल.
रक्ताच्या नात्याची महती कळेल.

दुनियेची ही वेडी रीत सोडून द्यावी.
सत्यासत्यता शांतीन अंतर्यामी पहावी.
धन, स्वार्थाचा फोलपणा कळावा.
नात्याच्या शक्तीचा साक्षात्कार व्हावा.

कवी : बाळासाहेब तानवडे

© बाळासाहेब तानवडे१०/१२/२०१०

Sunday, December 5, 2010

रत्न

रत्न
राजाची  अन  राणीची ,
गोष्ट  आहे  नवरत्नांची.
एकजुटीच्या  प्रयत्नांची ,
विलग  होऊन  सलग  होण्याची.

राजाचा    आणि   राणीचा,
संसार  होता  काबाड  कष्टाचा .
सच्चाईच्या  वागण्याचा ,
म्हणून  होता  समाधानाचा.

अथक  कष्टाचे  चीज  झाले.
अंकुरून नासिबाचे  बीज  आले.
नवसा सायासाने  ना  कुणा  मिळे.
तो  नवरत्नांचा  हार  यांना  फळे.

नव  रत्ने  सारी  सुरेख  होती ,
प्रत्येकाची  अलग  चमक  होती.
पण  एकाच  तेज  भारी  होत,
जणू  सर्वांच  राज  कारभारी  होत.

सर्वांची  त्यावर  माया  होती.
त्याची  सर्वावर  गर्द  छाया  होती.
पण  अचानक  गहजब  झाले.
ते  रत्नच  हरातून  अलग  झाले.

आकांड  - तांडव  गोंधळ  झाले.
एकजुटीचे  तुकडे  पडले.
निराशेचे  ढग  साचले.
दुःखाचे  डोंगर  मग  रचले.

प्रयत्नांची  शर्थ  झाली.
बोलणी  सारी  व्यर्थ  झाली.
अखेर  जागा  त्याची  रिती  राहिली.
पण  याद  मात्र  जिती  राहिली.

राणीने  तर  श्वास  सोडला.
राजाचाही  श्वास  कोंडला.
रत्नांचा उल्हास सांडला.
नात्यावरचा विश्वास उडाला.

पण  अचानक  वारे  फिरले.
फिरून  ते  रत्न  माळेत शिरले.
वियोगाचे  दिन  आता  सरले.
प्रत्येक  मन  आनंदाने  भरले.

कवी : बाळासाहेब तानवडे
 © बाळासाहेब तानवडे १६/११/२०१०
(Ratn)