Sunday, October 31, 2010

वादळ

तुझ्या आगमनाची चाहूल लागली.
मने जशी फुलपाखरू झाली.
बालपणीच्या लडिवाळ लीलांनी तुझ्या.
घरा – दाराला आनंदाची भरती आली.

तुझे बाल हट्ट पुरवता – पुरवता.
शिक्षणाचे बाळकडू भरवता – भरवता.
तारुण्याच माप कधी ओलांडलस, ते समजलच नाही.
प्रेमाचा आलाप कधी आळवलास, ते उमजलेच नाही.

आपला जोडीदार स्वताच निवडला.
वर संशोधनात वेळ नाही दवडला.
एक – दुसऱ्यांना तुम्ही समजून घेतले.
आम्ही तुमचे कांहीसे उमजुन घेतले.

पण तुझी निवड कांहीशी अलग होती.
समाज्याच्या नियमाशी न सलग होती.
परिस्थितीची दिली तुला सर्वानी जाण.
तुलाही आल वास्तवाचं काहीस भान.

पण लग्नाच्या गौप्यस्फोटाने केला कहर.
आमचे जीवन झाले, जसे जहर.
शांत घराची रणभूमी झाली.
अखेर तुझी घराला कायमची कमी झाली.

तुझ्या स्वप्नांची फुले झाली.
आम्ही दिलेल्या स्वातंत्र्यामुळे झाली.
मात्र आमची जीवन बागच कोमेजली.
तुला आमची कधी मनेच नाही समजली.

तुझे सुख तू पाहिलेस.
आम्हाला घोंगावणाऱ्या वादळाला वाहीलेस.
तुझ्यासाठी आयुष्यभर खस्ता खाल्या .
तू मात्र आम्हास समाजाच्या आयुष्यभरच्या चपला दिल्या.

शाहू – फुलेंचे विचार आम्ही मानतो गहन.
पण जनशक्ती पुढे आम्ही पडतो खुपच लहान.
मुठभरांसाठी ठरेल तुझे कृत्य महान.
पण उरलेल्यांसाठी आम्ही ठरू पायची वहान.


कवी : बाळासाहेब तानवडे



 © बाळासाहेब तानवडे २५/१०/२०१०

No comments:

Post a Comment