Thursday, December 16, 2010

कल



आई म्हणे तू हेच कराव. 
बाबा म्हणती तू हे ध्येय धरावं. 
मला न कळे अस का व्हाव . 
दोन्ही पासून मन दूर दूर पळाव. 

शाळेच्या विषयांत रस नसावा. 
कॉलेज मिळे पाहून गुणांच्या धावा. 
मला न कळे अस का व्हाव . 
शिक्षणाच पर्व असच वाया जाव. 

नोकरी मिळे पाहून पदवी. 
नावडत्या कामाचं स्वरूप पदोपदी रडवी. 
मला न कळे अस का व्हाव . 
नऊ ते पाच मध्ये जीवन धडपडत जावं. 

या सर्वाला का जीवन म्हणावं. 
ज्यात तडजोडीन कसंतरी जीन जगावं. 
म्हणुन स्वत:ची क्षमता आणि कल स्वत:च जाणावा. 
जीवनाच्या प्रत्येक टप्यात फक्त आनंदच मिळवावा.


कवी : बाळासाहेब तानवडे

© बाळासाहेब तानवडे – १६/१२/२०१०

http://marathikavitablt.blogspot.com/
http://hindikavitablt.blogspot.com/

(Kal)



No comments:

Post a Comment